Tuesday, August 9, 2016

महिलांवरील अत्याचार रोखावेत.



स्त्रियांवरील अत्याचारांच्या बातम्या सध्या वारंवार येऊन धडकत आहेत.पूर्वी बलात्कार होतेच नव्हते,असे कोणीही म्हणंणार नाही: परंतू आजकाल त्यांची संख्या लक्षणीय म्हणावी इतकी वाढलेली दिसत आहे.विकास आणि सुसंस्कृतपणात अग्रेसर असल्याचा टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रातूनच या बातम्यांची मालिका सुरु असल्याने कुणादी सुजाण नागरीकास त्याची लाज वाटेल.बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शारिरीक शोषण, खुले आम होणारी अश्लील शेरेबाजी, वासुगिरी, दुकानातील छोटय़ा चेंजिग रुममध्ये छुप्या कॅमेऱ्यातून तयार होणाऱ्या ‘व्हिडीओ क्लिप’ आदी माध्यमातून महिला व युवतींचे शोषण सुरू आहे.समाज कोठे चालला आहे?  




महिलांवरील अत्याचार वा विनयभंगाच्या घटना देशात रोज कुठे ना कुठे घडत असतात, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. देशात पोलीस आहेत, सुरक्षा यंत्रणा, कायदे, न्यायालये, अपराध्याला शिक्षा या सर्व गोष्टी असतानाही स्त्रियांवर अत्याचार करू पाहणा-या नराधमांना कायद्याची जराही भीती वाटत नाही वा आपल्या कृत्याची जराही लाज वाटत नाही, ही खरोखर चिंतेची बाब आहे.




महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता घराबाहेर पडलेली स्त्री सुरक्षित नाही, अशीच सार्वत्रिक भावना दिसते. घराबाहेर पडलेल्या नोकरदार महिलेवर किंवा शाळा-महाविद्यालयात जाणा-या मुलीवर कुणाचा कधी हल्ला होईल, तिचे अपहरण होईल, बलात्कार होईल, तिच्यावर अ‍ॅसिड वा उकळते तेल फेकले जाईल, याची शाश्वती उरलेली नाही.



महिलांवरील लैगिंक अत्याचार व हिंसक हल्ले कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळेच थांबविता येऊ शकतील. अपराध्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. त्याचबरोबर समाजामध्ये महिलांबद्दल जो पूर्वापार खोल रुजलेला दूषित दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी सामाजिक मानसिकताही बदलणे गरजेचे आहे. 
गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाणही कमी आहे.हे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी सार्वत्रिक प्रयत्नाची आवश्यकता आहे.राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची तड लागावी, हे गुन्हे कमी व्हावेत यासाठी सरकारने योजलेल्या उपाययोजनांना चांगले यश मिळत आहे.

राज्यामध्ये वाढत्या व्यसनाधीनतेमुळे महिलांवरील अन्याय, अत्याचार वाढत चालले आहेत. शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्यांची हत्या केली जाते.कायद्याने महिलांना हक्क व संरक्षण दिले असले तरी समाजात समानतेची भावना अजून वाढीस लागली नाही. स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने समर्थपणे काम करीत असल्या तरी दारूमुळे महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत.



देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर "केवळ कडक कायदे करणे पुरेसे नाही.

 महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न केवळ भारतापुरता मर्यादित नाही.खरे म्हणजे हा महिलांच्या हक्काचा प्रश्न नसून मानवी हक्काचा प्रश्न आहे. जर महिलांना सुरक्षित वाटत नसेल तर संपूर्ण समाजाचीच उलथापालथ होते आणि त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांनी उठून अन्याया विरुद्ध झगडून योग्य मार्ग शोधला पाहिजे. माझा ठाम विश्वास आहे की मानवी मूल्यांचे जतन करून महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे . 


महिलांवर होणार्‍या अन्याय-अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करून त्या कायद्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासन आपल्यापरीने प्रयत्न करत असताना या कामात सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा असा प्रयत्न करण्यात येत आहे. सजग व जागरूक नागरिकांनी असे अत्याचार रोखण्याकरिता सहभाग घेतल्यास महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. सजग नागरिकांना प्रोत्साहित केले तर परिस्थिती सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या पध्दतीने महिलांवरील अत्याचारविरूध्द काम करणाऱ्या नागरिकांसाठी निर्भय पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.याबद्द्ल कितीजणांना दिला काही कळले नाही कि कोणीही महिलांवरील अत्याचारविरूध्द काम केले नाही.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे गरजेचे असून, समाजानेसुद्धा आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.

अत्याचारच होऊ नये अथवा ते रोखणे महत्वाचे आहे.

No comments: