Wednesday, August 10, 2016

अपयशी संघर्ष



ईशान्य भारतात लागू असलेला लष्कराचा विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हटविण्याची मागणी करत मागील सोळा वर्षांपासून उपोषण करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी अत्यंत जड अंत:करणानं उपोषण सोडल्याने अपयशी लढाईची सांगता झाली. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी लढाई थांबवली आहे.पंधरा वर्षांपेक्षा जास्त  काळ उपोषण करून जगातील सर्वाधिक उपोषण  करणारी व्यक्ती ठरलेल्या इरोम चानू शर्मिला ला "मणिपूरची लोहमहिला‘ संबोधले जाते.इरोम शर्मिला यांनी तब्बल १६ वर्षं अन्नपाण्याचा त्याग केला होता. त्यामुळे सरकारने त्यांच्या अन्ननलिकेत नळी सोडून त्यांना लिक्विड स्वरूपात पोषक घटक पुरवण्यात येत होते. ४ नोव्हेंबर २००० रोजी आसाम  रायफल्सच्या जवानांकडून मणिपूरमध्ये १० नागरिक मारले गेले होते.त्या घटनेचा निषेध  करत मणिपूरमध्ये लष्कराला असलेला विशेषाधिकार रद्द करण्यात यावा या मागणीसाठी  इरोम शर्मिला यांनी तेव्हापासूनच उपोषणाला सुरूवात केली होती. शर्मिला यांनी हा कायदा रद्द व्हावाच या कळकळीने सुरू केलेले उपोषण अनेकवेळा अटक झाल्यावरही सोडले नाही. 

इरोम यांच्या उपोषणावरून लोकांमध्ये दोन मते बनली आहेत. इरोम यांनी विशेषाधिकार रद्द करण्याचे लक्ष्य साध्य झाल्यानंतरच उपोषण सोडायला हवे होते असे एका गटाचे मत आहे तर दुसर्‍या गटाने तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. 





आताचे राजकिय नेते सामान्यांसाठी असा संघर्ष करतील का? 

आसाम मध्ये दहशतवादी हल्ल्यात सामान्य नागरीक व जवान मारले जात आहे.
सरकारकडे इच्छाशक्ती असेल हे हल्ले बंद होऊ शकतात व कोणाला असा दिर्घ्काळ संघर्ष करावा लागणार नाही.





No comments: