Friday, January 22, 2016

सुरक्षा यंत्रणांना कायम सतर्क राहणे गरजेचे आहे.

   

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाची सुरक्षा देखील मजबूत असायला पाहिजे.दहशतवाद भारताचा पिच्छा सोडायला तयार नाही. तसा तो सोडणारही नाही. दहशतवाद्यांच्या रडारवर भारत यापुढील काळातही राहणार असल्याने चोख सुरक्षाव्यवस्था असायलाच हवी.आतंकवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर सीमेवरील रहिवाशांना सतर्क रहाण्याची चेतावणी वारंवार दिली पाहिजे.सुरक्षिततेचा विषय आम्ही गंभीरतेने जेव्हा घेतो ज्यावेळी एखादी दहशतवादी घटना घडते तेव्हाच. इतर वेळी मात्र आपण बेफिकीरीत राहतो आणि याच गोष्टीचा फायदा दहशतवादी घेतात.मात्र एखादा हल्ला अथवा एखादी दुर्घटना घडल्यावरच संबंधित यंत्रणांना जाग येते, याला सरकार व पोलीस जबाबदार आहेत. थोडक्यात काय, सुरक्षिततेचा विषय ज्या पद्धतीने गांभीर्याने आणि सातत्यपूर्ण दक्षता ठेवून हाताळायला पाहिजे, तसा तो हाताळला जात नाही. 

  पठाणकोटवर झालेल्या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्र्यानी सुरक्षेसंदर्भात काही त्रुटी राहून    गेल्या याची   कबुली दिली. सुरक्षाव्यवस्थेतेतील  ढिलाईमुळे पठाणकोट हवाई तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी   केलेल्या हल्ल्यात प्रतिकार करताना अधिकारी व    जवान शहीद झाले. गाफीलपणामुळे पठाणकोट हवाई तळावरील हा हल्ला झालेला आहे.तो पूर्वनियोजित होता आणि अजूनही  हल्ल्याची शक्यता आहे.कोणत्याही प्रकारची हलगर्जी फार मोठी किंमत मोजायला लावू शकेल.

       पठाणकोटचा हल्ला हा  देशाच्या सीमा सुरक्षित नसल्याचा व देशाची अंतर्गत सुरक्षाही साफ कोसळल्याचा पुरावा आहे. तसेच सीमावर्ती भागातून होणारी घुसखोरी रोखण्याकरिता भारतातील सुरक्षायंत्रणांनी वारंवार प्रयत्‍न केले जाते. 

आणखी एक बाब म्हणजे अशा हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे असणे गरजेचे ठरते. दहशतवाद्यांकडे  रायफल्स असतात आणि त्यांचा मुकाबला आपले पोलिस साध्या बंदुकीच्या सहाय्याने करतात. उलट दहशतवादी वरचेवर आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करत आहेत. त्या तोडीचे शस्त्रास्त्रे आपल्या पोलिसांकडे असण्याची आवश्यकता आहे. आधुनिक शस्त्रास्त्राशिवाय पोलिसांना दहशतवाद्यांशी लढण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याचीही आवश्यकता आहे. किंबहुना ती काळाची गरज आहे. 

दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी दहशतवाद्यांना आपल्या देशातील कोण, कोणत्या स्वरूपाची, कशी मदत करतात हे शोधून काढणे आणि तसे करणार्यांवर कठोर कारवाई करणे हा मार्ग अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण दहशतवादी एकदम येऊन एखाद्या ठिकाणी हल्ला करू शकत नाहीत. त्यांना कोणी ना कोणी स्थानिक मदत करत असणार आहेत. ही मदत बंद झाली तर दहशतवाद्यांना कारवाया करणे कठीण जाईल हे नक्की. या सार्या बाबींचा आता तरी गांभीर्याने विचार केला जायला हवा.सुरक्षेसाठी पोलीस दलाचे संख्याबळ वाढविणे ही काळाची गरज आहे.देशविरोधी घटना घडत असतानाही शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहे?

दहशतवादी  संघटनांच्या वाढत्या कारवायांमुळे पुढील काळ भारतीय  सुरक्षायंत्रणांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.त्यांनी सदैव सावधगिरी बाळगायला हवी.  

    पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचा अंत होत नाही तोवर सुरक्षायंत्रणांनी कायम सतर्क राहावे लागणार आहे.सीमावर्ती भागातून होणारी घुसखोरी रोखण्याकरिता भारतातील सुरक्षायंत्रणांनी वारंवार प्रयत्‍न केले जाते.

       सुरक्षा यंत्रणा कायम सर्तक राहिल्यास दहशतवादी कधीच हल्ले करु शकणार  नाहीत.

No comments: